सोलापूर : महाराष्ट्र शासनाने २०१६ पासून प्रत्येक जुलै महिन्यात दोन कोटी वृक्ष लागवडीचा निर्णय घेतला आहे. या उद्देशाने २०१७ मध्ये चार कोटी वृक्ष लागवड करण्याचा महाराष्ट्र शासनाचा संकल्प आहे. त्याचाच एक भाग म्हणून येथील ए. जी. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले.
महाविद्यालयाच्या एन. एस. एस. विभागाच्या वतीने महाविद्यालयाच्या प्रांगणात १०० रोपे लावण्यात आली. याप्रसंगी प्राचार्य डॉ. एस. ए. पाटील, उपप्राचार्य प्रा. व्ही. व्ही. पोतदार यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच प्रत्येक विभागाचे प्रमुख प्रा. गदवाल एस. बी., प्रा. लिगाडे एस. जे., प्रा. खुरेशी एम. ए., प्रा. मसलेकर टी. डी., प्रा. कुलकर्णी आर. बी. आणि टी. पी. ओ. विभागप्रमुख प्रा. एस. व्ही. पाटील यांच्या हस्तेही वृक्षारोपण करण्यात आले.
‘प्रत्येकाने एक एक वृक्ष दत्तक घ्यावा व त्याला जगवावे, त्याला वाढवावे,’ असे आवाहन या वेळी प्राचार्य डॉ. पाटील यांनी केले. हा वृक्षरोपण कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता प्रा. स्वामी आणि एन. एस. एस. कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष ए. जी. पाटील, सेक्रेटरी एस. ए. पाटील, कॅम्पस डायरेक्टर डॉ. एम. ए. चौगुले, प्राचार्य डॉ. एस. ए. पाटील, उपप्राचार्य प्रा. व्ही. व्ही. पोतदार यांचे मार्गदर्शन लाभले.